रेशनकार्ड आपल्या हक्काचे किती रेशन आहे? आता पाहू शकता आपल्या मोबाईल वर

By AviratEducation

Updated on:

Follow Us
---Advertisement---
रेशनकार्ड

रेशनकार्ड अथवा शिधापत्रिका म्हणजे रास्त दर दुकानातून जीवनाश्यक वस्तू व शिधा मिळविण्यासाठी सार्वजनिक वितरण योजनेमार्फत पुरवण्यात येणारी व्यवस्था. रेशनकार्ड मिळविणे, त्याचे नूतनीकरण करणे किंवा फाटलेले, जीर्ण, गहाळ झालेले रेशनकार्ड बदलून घेणे, नवीन नावे समाविष्ट करणे, नावे कमी करणे हे सर्व आपल्यासाठी नेहमीच आव्हानात्मक वाटत असते. सर्व सरकारी कामासाठी उपयुक्त ठरणारे रेशनिंग कार्ड कसे मिळवायचे व उपयुक्तता याची माहिती देणारी ही हेल्पलाइन.



आपल्या हक्काचे किती रेशन आहे? आता पाहू शकता आपल्या मोबाईल वर
  खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा व आपल्या रेशन कार्ड वरील
SRC NO टाकून SUBMIT या बटणावर क्लिक करा  
आधिक माहिती साथी हा व्हीडिओ पहा 
कसे मिळवाल नवीन रेशनकार्ड
ज्या व्यक्तीचे नाव कोणत्याही रेशनकार्डात समाविष्ट नाही, अशा व्यक्तींच्या वास्तव्याच्या ठिकाणच्या तहसील कार्यालयात, अन्न धान्य ​वितरण कार्यालय अथवा शिधावाटप नियत्रकांच्या कार्यक्षेत्रातील कार्यालयात विहित नमुन्यात अर्ज करावा. हे अर्ज त्या कार्यालयात उपलब्ध असतात. त्या अर्जात संपूर्ण नाव, पत्ता, वय, कुटुंबातील व्यक्तींचे नावे, वय, नाते इत्यादी माहिती भरून दिल्यानंतर माहिती बरोबर आहे किंवा नाही याबाबत पुरवठा निरीक्षक/शिधावाटप निरीक्षक यांनी खात्री केली जाते. पडताळणी तपशील योग्य असल्याची खात्री होताच अशा व्यक्तीस रेशनकार्ड दिले जाते.


आवश्यक कागदपत्रे


पूर्वीच्या रेशनकार्डमधून नाव कमी केले असेल, त्या तहसीलदार, अन्नधान्य वितरण अधिकारी यांचा दाखला असणे आवश्यक आहे. तर त्याचबरोबर स्वत:चे घर असल्यास घराच्या मालकीचा पुरावा, लाइट बिल, बँकेचे पासबुक, टेलिफोन/मोबाइल बिल आवश्यक आहे. तसेच फोटो ओळखपत्रासाठी पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, अलॉटमेंट लेटर किंवा आधार कार्ड यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरला जातो. भाड्याने राहणाऱ्यांसाठी घरमालकाचे संमतीपत्र व मालकाच्या नावे लाइट बिल आणि घर भाडे करारपत्राची झेरॉक्स.


कोणाला कोणते कार्ड मिळते

पांढरे – १ लाख रुपयांहून अधिक वार्षिक उत्पन्न असलेले कुटुंब

केशरी – १५ हजार ते १ लाख रु. दरम्यान उत्पन्न असलेले कुटुंब

पिवळे बीपीएल – १५ हजार रुपयांपेक्षा कमी वाषिक उप्तन्न असलेले कुटुंब

अंत्योदय – पिवळ्या कार्डधारकांपैकी अतिगरीब असलेली कुटुंबे

अन्नपूर्णा – कोणत्याही पेन्शन योजनेचा लाभ न मिळणारी ६५ वर्षांहून अधिक वय असेलेली निराधार व्यक्ती

तक्रार आणि हेल्पलाइनसाठी

मुळात रेशकार्ड काढण्यासंदर्भात कोणत्याही प्रकारच्या तक्रारी असल्यास शिधावाटप परिमंडळ कार्यालयात त्या करता येतात किंवा विभागानुसार मुंबई शहरात सध्या ४५ विभाग कार्यालये असून त्यानुसार त्याठिकाणी जाऊन तक्रार करू शकता किंवा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या http://fcs.maharashtra.gov.in या वेबसाइटवर भेट देऊ शकता किंवा १८००२२४९५० किंवा १९६७ या टोलफ्री नंबर संपर्क साधू शकता. महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या rksmumbai88@gmail.com या ईमेल आयडीवरही संपर्क करू शकता.

/*54745756836*/

Related Post

Leave a Comment