बदलत्या शैक्षणिक प्रवाहासाठी प्रशिक्षण थोडक्यात जाणून घेवू

By AviratEducation

Updated on:

Follow Us
---Advertisement---

अध्ययन-अध्यापन प्रक्रिया दर्जेदार होण्यासाठी शिक्षकाचे योगदान महत्त्वाचे आहे. अध्यापन अधिकाधिक परिणामकारक होण्यासाठी शिक्षक सक्षम असायला हवा. त्याचे ज्ञान अद्ययावत व कालसुसंगत असायला हवे. अध्ययन-अध्यापन या सतत प्रवाही असणाऱ्या प्रक्रियेमध्ये शिक्षकांच्या अनुभवाचा इतरांना उपयोग होण्यासाठी व स्वतः शिक्षकाला या प्रवाहातील बदलांची माहिती होण्यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता कशी आहे व त्याचा उपयोग काय हे लेखक या लेखातून सांगत आहे.

‘The best way to predict the future is to create it.’

हे विधान वर्तमानात करावयाच्या नेमक्या कृतीवर भर देणारे आहे. संपन्न आणि समृद्ध भविष्याची ग्वाही जशी प्रत्यक्ष कृतीत आहे तीच ती आशयसमृद्ध, व्यवहार कुशल, कौशल्याधिष्ठित शिक्षणात आहे. शिक्षण कशासाठी? असा प्रश्न जेव्हा उपस्थित केला जातो तेव्हा ज्ञानासाठी असेच उत्तर दिले जाते. ज्ञान कशासाठी ? या प्रश्नाच्या उत्तरात सुख-समृद्धीसाठी, अशी अपेक्षा असतेच. एका संस्कृत श्लोकामध्ये हेच तर मांडले आहे

विदया ददाति विनयं विनयाद याति पात्रताम्।

पात्रत्वात् धनमाप्नोति धनात् धर्म ततः सुखम् ।।

विदयेचा-ज्ञानाचा पर्यायाने शिक्षणाचा संबंध सुखाशी जोडला गेला आहे. मग सुखाच्या परिभाषा काळानुरूप बदलत गेल्या आहेत. त्याच तत्त्वानुसार शिक्षणात, शिक्षणक्रमात, शिक्षण पद्धतीत, एकूणच शिक्षण प्रक्रियेतदेखील काळानुरूप बदल होणे अपरिहार्य होते- आहे- असेल. शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.

शैक्षणिक प्रवाह

शिक्षण प्रणाली आखताना विद्यार्थी हा चांगला नागरिक बनावा, त्याला विज्ञाननिष्ठ व अखंड ज्ञानलालसा असावी ही अंतिम उद्दिष्टे जरी कायम समान असली तरी कालपरत्वे त्यात काही बदल घडून येतात, नवी प्रणाली उदयास येते. शिक्षणप्रणालीमध्ये विषयांची संख्या, आशयाची मांडणी, अध्यापन पद्धती, अध्ययन तंत्र, उपक्रम यांमध्ये काळानुरूप व गरजेनुसार सतत बदल झालेले आहेत, भविष्यातही होत राहतील. शिक्षणातील हेच बदल प्रवाह म्हणून ओळखले जातात. काळानुरूप व गरजांनुरूप उदयास आलेले हे प्रवाह तत्कालीन शिक्षण व्यवस्थेवर परिणाम करतात. उद्दिष्टांप्रत पोहचणारे परिणाम सकारात्मक गटात मोडतात तर अभिप्रेत अशी उद्दिष्टे गाठण्यात अपयश आल्यास ती प्रणाली – तो प्रवाह बाद होऊन त्याची जागा नवा प्रवाह घेत असतो. भारताचा विचार केला असता एक संपन्न असा प्राचीन वारसा या देशाला लाभलेला आहे. जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक

असणाऱ्या या देशात प्राचीन काळी शिक्षणाचा समृद्ध वारसा होताठेवा होता. वैदिक संस्कृती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या संस्कृतीतील वैदिक शिक्षण ही एक संपन्न – समृद्ध – अत्युच्च शिखरावर असणारी शिक्षण प्रणाली होती.

भूतकाळाचा आढावा + वर्तमानकाळात विकसन + भविष्यासाठी सज्ज = प्रशिक्षण

केवळ एकदा मिळवलेले ज्ञान हे पुरेसे नसून ते वेळोवेळी गरजेनुरूप व काळानुरूप अद्ययावत करणे, त्यासाठी आवश्यक असणारी कौशल्ये, तंत्रे आत्मसात करणे, नवीन पद्धतींचा विचाराचा स्वीकार करून अवलंब करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशिक्षण हा प्रभावी मार्ग आहे.

प्रशिक्षणाचे प्रकार

कौशल्ये, सवयी, ज्ञान व दृष्टिकोन विकसित करण्याची प्रक्रिया म्हणजे प्रशिक्षण होय. विकसनाची ही प्रक्रिया शिक्षणाप्रमाणेच निरंतर चालणारी असल्याने प्रशिक्षणे निरंतर स्वरूपाची असतात, असे म्हटले जाते. त्यामुळे गरजेनुसार समाजशास्त्रज्ञ, अभ्यासक प्रशिक्षणाचे वेगवेगळे प्रकार मांडतात. त्यात प्रामुख्याने औपचारिक प्रशिक्षण, प्रवेशपूर्व प्रशिक्षण, प्रवेशोत्तर काळातील प्रशिक्षण, सेवाकाळातील प्रशिक्षण, पुनरावलोकन प्रशिक्षण, नवीनीकरण प्रशिक्षण, कार्याची जबाबदारी सोपवून प्रशिक्षण, अल्पमुदतीचे प्रशिक्षण, दीर्घ मुदतीचे प्रशिक्षण, विभागीय प्रशिक्षण, केंद्रित प्रशिक्षण, कुशलतेचे प्रशिक्षण, पार्श्वभूमीविषयक प्रशिक्षण, अनौपचारिक प्रशिक्षण यात व्यवस्थापनाला, नियंत्रण आणि मूल्यमापन विभागाला जाणवणाऱ्या समस्या व गरजा यांचा हे वर्गीकरण करताना प्रकार मांडताना विचार केलेला दिसून येतो. शिक्षणक्षेत्रातील विविध घटकांची प्रशिक्षणे यानुसारच गरजा व समस्यांवर आधारित असतात. सगळ्याच शिक्षण प्रवाहांमध्ये प्रशिक्षणाचे महत्व मांडण्यात आले आहेत. त्यासाठीची स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली आहे.

प्रशिक्षणांची आवश्यकता

बदलत्या शिक्षण प्रवाहांनुसार अध्यापन हे केवळ अंतिम उद्दिष्ट नसून शिक्षकाला त्यापलीकडे विदयार्थ्यांचा शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक, सांस्कृतिक व नैतिक विकास करायचा आहे. सोबत तंत्रानुगामी स्पर्धात्मक जगात आपला विदयार्थी कसा टिकेल यासाठी त्याला तयार करायचे आहे. त्यासाठी शिक्षकाच्या ठायी योग्य अभिवृत्ती, मनोवृत्ती, कौशल्य व योग्यता असणे आवश्यक आहे. Mirror of Nation असे मानल्या जाणाऱ्या शिक्षकाला त्यादृष्टीने तयार असणे अत्यावश्यक ठरते. केवळ अध्यापनशास्त्राचे तांत्रिक ज्ञान, पुस्तकी ज्ञान असून उपयोगाचे नसून समस्या निराकरण, नवविचारांचे स्वागत, विदयार्थी विकासासाठी विदयार्थ्यांचे गुण हेरून त्याचे संगोपन (Nurture) करणे, त्याच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्यासाठी प्रत्यक्ष अनुभवाची गरज असते. असे अनुभव प्रशिक्षणात वापरण्यात आलेली विविध तत्त्वे, तंत्रे व साधने यांच्या सुयोग्य प्रवाही आयोजनातून देता येतात.

प्रशिक्षणाबाबत 3A approach

 बदलत्या काळाची गरज म्हणून प्रशिक्षणे आवश्यक ठरतात; परंतु ठोकळेबाज व एकतर्फी प्रशिक्षण पद्धती आजकाल बाह्य झाली आहे. प्रशिक्षणाची एक महत्त्वाची बाजू ही उपयुक्तता आहे. प्रशिक्षण गरजांशी किती सुसंगत आहे यावरूनच प्रशिक्षणाची गुणवत्ता ठरते.

प्रशिक्षणांमध्ये गरजा ओळखल्या जात नसतील तर प्रशिक्षण केवळ एक पार पाडण्याची प्रक्रिया ठरते. प्रशिक्षण उपयुक्त ठरायचे असेल तर प्रशिक्षणांबाबत 3A approach वापरणे महत्त्वाचे व कालसुसंगत ठरेल. Assessnent – Analysis Action ( मूल्यमापनविश्लेषण – कृती) या 3A approach च्या माध्यमातून प्रशिक्षणाकडे पाहिले जाऊन त्याआधारे प्रशिक्षणांचे आयोजन करणे फायदयाचे ठरेल.

 

 /*54745756836*/

Leave a Comment